दिल्लीतील गोकलपुरी येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाला. शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री आग आटोक्यात आणण्यात आली, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाने आज दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून सात मृतदेह बाहेर काढले.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अतिरिक्त पोलिस उपायुक्त (ईशान्य) देवेश कुमार महला यांनी सांगितले की, आगीची माहिती पहाटे १ च्या सुमारास मिळाली, त्यानंतर पोलिस आणि अग्निशमन अधिकारी घटनास्थळी पोहोचले.”पहाटे १ वाजता गोकलपुरी पीएस भागात आगीची घटना घडली. सर्व बचाव उपकरणांसह तात्काळ पथके घटनास्थळी पोहोचली. आम्ही अग्निशमन विभागाशी देखील संपर्क साधला ज्यांनी चांगला प्रतिसाद दिला. आम्ही पहाटे ४ वाजेपर्यंत आग आटोक्यात आणू शकलो,” असे ईशान्य दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी म्हणाले.आगीत साठ झोपड्या जळून खाक झाल्या.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.”सकाळी ही दुःखद बातमी ऐकली. मी घटनास्थळी जाईन आणि बाधित लोकांना वैयक्तिकरित्या भेटेन,” असे त्यांनी हिंदीत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
0 Comments