राष्ट्रवादीचा मोठा निर्णय : नवाब मलिकांची सर्व खाती काढून घेतली; आता ‘या’ नेत्यांवर पवारांनी सोपवली जबाबदारी

 “मी भाजपाचा पुन्हा राज्यात सत्तेत येऊ देणार नाही”, असा निर्धार शरद पवारांनी गुरुवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आणि नेतेमंडळींना दिला. या मुद्द्यावरून आता भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. शरद पवारांच्या याच विधानाला आता भाजपाकडून खोचक शब्दांत प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “तुमच्या पक्षाचे ६० पेक्षा जास्त आमदार निवडून आणून दाखवा”, अशा शब्दांत भाजपानं शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यामध्ये पवारांनी आपल्या पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन केलं.

“घाबरू नका”, शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला धीर!

“भाजपाकडून होणाऱ्या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ दणार नाही”, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला. तसेच, भाजपाकडून परिश्रम घेण्याची तयारी, नियोजन अशा गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचं देखील पवारांनी यावेळी सांगितलं.

“आदरणीय शरद पवार साहेब…”

दरम्यान, शरद पवारांच्या या विधानावर भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. “आदरणीय शरद पवार साहेब..कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला १०५ जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल”, अशा शब्दांत महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटर हँडलवरून शरद पवारांवर निशाणा साधण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e