कोलकाता: गेल्या महिन्यात किमान नऊ जणांचा बळी घेणार्या बीरभूम हिंसाचार प्रकरणात (Birbhum violence case) पहिली अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने आज मुंबईतून चार संशयितांना अटक केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या सर्वांना मुंबईतून CBI ने अटक केली आहे. मात्र ते मुंबईतील वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले नाही.
काल कोलकाता उच्च न्यायालयाने 21 मार्चला झालेल्या हिंसाचारावर केंद्रीय तपास संस्थेचा प्राथमिक अहवाल रेकॉर्डवर घेतला. हिंसाचाराला बळ देणाऱ्या उप ग्रामप्रधान यांच्या हत्येची चौकशी केंद्रीय एजन्सीने करावी की नाही यावर उच्च न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला होता.
सीबीआयने बुधवारी स्थानिक न्यायालयात गेल्या महिन्यात राज्यातील बीरभूम हत्याकांडात अटक करण्यात आलेल्या तृणमूल काँग्रेसचे नेते अनारुल हुसैन यांच्यासह आठ जणांची पॉलीग्राफ चाचणी करण्याची परवानगी मागितली. तपास यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, तपास पुढे नेण्यासाठी पॉलीग्राफ चाचणी आवश्यक आहे. हुसेन आणि इतर चौकशीदरम्यान काय बोलत आहेत याची आम्हाला पुन्हा तपासणी करण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले होते
टीएमसी पंचायत अधिकारी भादू शेख यांच्या हत्येनंतर, 21 मार्च रोजी बिरभूमच्या बोगटुई गावात काही लोकांनी हल्ला केला आणि घरांना आग लावली, ज्यात मुलांसह नऊ लोक ठार झाले. शेख यांच्या हत्येनंतर झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याचे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले होते. आता या बीरभूम हिंचाराचे महाराष्ट्र कनेक्शन उघड झाले आहे.
0 Comments