विवाहाला केवळ पाच दिवस बाकी असतांना नवरदेवाचा शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जळगावच्या एरंडोल येथे घडली आहे.
बराच वेळ झाल्यानंतर देखील भावेश मोटरसायकल घेवून न आल्यामुळे ज्ञानेश्वर महाजन यांनी भावेशच्या घरी जाऊन चौकशी केली. पण तिथेही तो अद्याप घरी आला नव्हता. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी, नातेवाईक, मंत्रिमंडळी आणि घरातील इतर सदस्यांनी त्याचा शोध सुरु केला. काही वेळानंतर भावेशचे भाऊ राकेश आणि मनोज यांनी त्यांचे काका ज्ञानेश्वर महाजन यांना फोन करुन दुखद बातमी सांगितली.
भावेश हा धरणगाव रस्त्यावरील त्याच्या शेताच्याजवळ असलेल्या सुनील पाटील यांच्या शेतातील विहिरीत पडला असून त्याचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे त्याच्या भावंडांनी काकांना सांगितलं. ज्ञानेश्वर महाजन हे त्यांचे नातेवाईक गजानन माळी यांच्यासह शेतात गेले. त्यांनी भावेशला परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने विहिरीबाहेर काढले आणि त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले. पण रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी भावेशचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भावेशच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. भावेशच्या आईची अवस्था पाहून संपूर्ण गाव रडू लागलं. दरम्यान, संबंधित घटनेबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments