गृहमंत्री अमित शाह यांनी पदाधिका-यांच्या बैठकीत हे स्पष्ट केले आहे. अमित शाहांनी भाजप पदाधिका-यांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. राम मंदिर, कलम 370 नंतर समान कायदा लागू करण्याची वेळ आली आहे. असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
समान नागरी कायद्याबाबत दोन मतं आहेत. भारतात अनेक वर्षांपासून यावर वाद सुरु आहे. पण समान नागरी कायदा लागू झाला तर काय होईल. जाणून घेऊया.
भारतीय राज्यघटनेत कायद्यांचं दोन भागात वर्गीकरण केलं जातं. नागरी कायदे आणि गुन्हेगारी कायदे.
लग्न, संपत्ती, वारसदार यांसारखे कुटुंब किंवा व्यक्तीशी संबंधित प्रकरणं नागरी कायद्याअंतर्गत येतात.
समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी राज्यांची आहे. केंद्राने कुठलाही कायदा बनवला तरी त्यात बदल करण्याचे अधिकार राज्यांना असतात. केंद्राने बनवलेल्या कायद्याच्या मॉडेलवर राज्य आपाला कायदा बनवू शकतात.
समान नागरी कायद्याचा म्हणजे सर्व धर्मांसाठी एकच कायदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व समाजांमध्येही एकसारखेच कायदे.
0 Comments