औरंगाबाद : वाणिज्य शाखेचं शिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीने शहरातील देवगिरी वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. आरती सर्जेराव कोल्हे (२०, रा. गुरूपिंप्री, ता. घनसावंगी जि. जालना) असं मृत विद्यार्थीनीचे नाव असून या घटनेनं वसतीगृह परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
वेदांतनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगिरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात तिसऱ्या मजल्यावरील रूम नंबर ४४ मध्ये आरती कोल्हे ही इतर मुलींसोबत राहात होती. शुक्रवारी सायंकाळी रूममध्ये कोणीच नसताना शॉलच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेत आरतीने आपलं आयुष्य संपवलं. आरतीजवळ एक चिठ्ठी सापडली असून त्यात जीवनाविषयी तिने बरंच काही लिहिलं आहे. इतर मुली रुममध्ये परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वेदांतनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगिरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतीगृहात तिसऱ्या मजल्यावरील रूम नंबर ४४ मध्ये आरती कोल्हे ही इतर मुलींसोबत राहात होती. शुक्रवारी सायंकाळी रूममध्ये कोणीच नसताना शॉलच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेत आरतीने आपलं आयुष्य संपवलं. आरतीजवळ एक चिठ्ठी सापडली असून त्यात जीवनाविषयी तिने बरंच काही लिहिलं आहे. इतर मुली रुममध्ये परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments