घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार तीन मच्छीमार पिंगळाई नदीत मासोळ्या पकडण्यासाठी टाकलेले जाळे काढण्यासाठी गेले हाेते. त्यांचा याच नदीत बुडून मृत्यू झाला. ही माहिती समोर आल्यानंतर काहींनी पाेलिसांना आणि प्रशासनाला कळविले.
घटनास्थळावरुन मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार हे तीनही मच्छीमार तिवसा तालुक्यातील रहिवासी आहेत. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार वैभव फरतारे हे देखील घटनास्थळी पाेहचले. तसेच जिल्हा व शोध बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले. सध्या तीनही मच्छीमारांच्या मृतदेहाचा शोध सुरू असल्याची माहिती प्रशासनानं दिली. या घटनेची वार्ता परिसरात धडकताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.
0 Comments