लग्नानंतर २० दिवसात बायकोचं अफेअर समजलं; ना खूनखराबा ना शोरशराबा, नवऱ्याचा मोठा निर्णय

प्रियंका आणि जितेंद्र गेल्या दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, वेगळ्या जातीचे असल्याच्या कारणावरुन दोघांच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबीयांचा विरोध होता.
लग्नानंतर अवघ्या २० दिवसात पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पळून जाण्यास परवानगी दिली. महिलेची आपल्याशी बळजबरीने लगीनगाठ बांधण्यात आलीये, तिचे दुसऱ्याच पुरुषावर प्रेम आहे, याची जाणीव होताच पतीने हे पाऊल उचलले. झारखंडमधील पालमू जिल्ह्यातील बिचकिला गावात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. ही घटना वाचून अनेकांना 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाची आठवण झाली
मनतू पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिचकिला गावातील रहिवासी सनोज कुमार सिंग याचा विवाह 10 मे रोजी प्रियंका कुमारीसोबत झाला होता. लग्नानंतर प्रियंका खुश नसल्याचं सनोजला जाणवू लागलं. आपल्याच गावात राहणाऱ्या जितेंद्र नामक तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते, असं समोजला समजलं.सध्या आसपासच्या घटना पाहता, पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची कुणकुण लागल्यास, पती स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करुन घेत असल्याचे पाहायला मिळते, किंवा पत्नी अथवा तिच्या प्रियकराचे प्राण घेत असल्याची उदाहरणं वाचायला मिळतात. मात्र सनोजने कुणाच्याही जीवाशी किंवा आयुष्याशी खेळ न करण्याचा निर्णय घेतला.
प्रियंका आणि जितेंद्र गेल्या दहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, वेगळ्या जातीचा असल्याच्या कारणावरुन दोघांच्या लग्नाना कुटुंबीयांनी विरोध केला होता.
आपल्या प्रियकराच्या विरहात दु:खी असलेल्या नववधूने जितेंद्रसोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. सनोजशी लग्न झाल्यानंतर २० दिवसांनी ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी ग्रामस्थांनी त्यांना रंगेहाथ पकडून मनतू पोलीस ठाण्यात नेले
घटनेची माहिती देण्यासाठी जेव्हा पती आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले तेव्हा पतीने पत्नीच्या तिच्या प्रियकराशी असलेल्या नातेसंबंधाला पाठिंबा दर्शवला. दोघांनी लग्न करण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितले. यामुळे साहजिकच तीनही जीव सुखी झाले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e