याबाबत अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे येथील रहिवासी सिद्धार्थ कचरू घेगडमल हे सकाळी बुद्ध विहारात दर्शनासाठी गेले असता विहारातील मूर्ती गायब असल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी तात्काळ बुद्ध विहार परिसरात राहत असलेल्या नागरिकांना बोलावून मूर्ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावेळी स्थानिक नागरिकांनी चोरीला गेलेल्या पितळी मूर्तीचे वजन सरासरी शंभर ते सव्वाशे किलो असल्याचे सांगितले. तसेच पांगरी गावातील खंडोबा मंदिर, महादेव मंदिर, दत्त मंदिर यासह आदी मंदिरातील पितळाची घंटा देखील चोरीस गेल्याचे समजते असून जवळपास दीड लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे बोलले जात आहे. तर पांगरी येथील रहिवासी महेश निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ वावी पोलीस ठाण्यास कळविली.
0 Comments