अनर्थ टळला: एसटीतील २० प्रवाश्यांचे जीव वाचले

रावेरहून सव्वा तीन वाजेच्या सुमारास जळगावकडे निघालेल्या बसच  पारश्या नाल्याजवळ अपघात झाला.समोरून येणारा कंटेनर चालक ओव्हरटेक करत असल्याने, हा अपघात घडला यात चालक व तीन प्रवाशी  किरकोळ जखमी झाले आहे. 

जळगांव आगाराची (बस क्र.एमएच  ४० एम ९८३४) रावेरहून जळगाव निघाली होती.सव्वा तीन वा.रावेर सोडल्यावर अगदी १० मिनिटाच्या अंतरावर जाऊन समोरून विवरे गावाकडून रावेरकडे येत असलेला कंटेनर चालक ओव्हरटेक करत असतांना,बसच्या दिशेने सुसाट आल्यावर बसचालकाने प्रसंगवधान राखत,बस विरुद्ध दिशेने थेट मक्याच्या शेतात घातल्याने,बसमध्ये असलेल्या २० प्रवाश्यांचे जीव वाचले आहे.

यात चालक बी बी कोळी व प्रवाशी पिंटू बारेला (वय २६),अंजली पिंटू बारेला (वय २०),कार्तिक पिंटू बारेला वय-३ वर्षे हे जखमी झाले आहे.सर्व जखमींना तातडीने रावेर ग्रामीण रुग्णालयात आणून उपचार करून सोडण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आगार प्रमुख  निलेश बेंडकुळे,सहा.वाहतूक अधीक्षक संदीप तायडे,वाहतूक निरीक्षक योगेश जोशी  हे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले.त्यांनी प्रवाश्यांना मदत केली.यातील जखमी वगळून अन्य प्रवाश्यांना इतर बसेस मधून पुढील प्रवासासाठी रवाना केले.

याबाबत बसचालक कोळी यांनी रावेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनर (क्र.डीडी एम ९४३२) चालक शहादत कलमखान रा.दिलदारनगर तहसील जमनिया जि.गाझीपूर उ.प्र.याविरुद्ध गुन्हा दखल करण्यात आला आहे. परिवहन मंडळाकडून जखमी प्रवाश्यांना तातडीने आर्थिक मदत करण्यात आली आहे.या बाबत तपास पो.कॉन्स्टेबल अतुल तडवी करत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e