अमरावती: अमरावती जिल्ह्यात लव जिहाद आंतरधर्मीय विवाहाचे रोज नवी प्रकरणं समोर येत आहेत. गेल्या सहा महिन्यापूर्वी मेळघाटातील धारणी येथील २३ वर्षीय तरुणीला अकोट येथून शेख रईस या तरुणाने पळवून तिला हैदराबाद येथे नेले व मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सहा महिन्यापूर्वी शेख रईस या तरुणाने आपणाला पळवून हैदराबाद येथे नेलं व मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला. शिवाय जिवे मारण्याची धमकी देत तरुणीला मुस्लिम धर्म परिवर्तनसाठी प्रवृत्त करत गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.
अखेर शेख रईस बाहेर गेल्याची संधी साधून या तरुणीने आपली आपबिती आईला फोन वरून सांगितली. ३ दिवसांपूर्वी तिला नातेवाईकांनी तिची कशीबशी सुटका करून दिला घरी आणले, आता सदर तरुणी सुखरूप असून तिने आपल्यावर होत असलेली अत्याचाराची सर्व माहिती प्रसार माध्यमांसमोर मांडली आहे.
सदर युवतीला बळजबरीने पळवून नेल्यानंतर घटनेची तक्रार धारणी पोलीस ठाण्यात करण्यात आलेली होती. मात्र, धारणी पोलिसांनी या प्रकरणात कमालीचा हलगर्जीपणा केला असा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला.
मुलीला जबरदस्तीने पळवून नेणाऱ्या शेख रईस व त्याला सहकार्य करणाऱ्या सर्व कुटुंबा वर कारवाई करून त्यांना अटक करावी व मुलीचा शोध न घेणाऱ्या धारनी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे.
0 Comments