दाेन नोहेंबरला कालावटी तांडा येथे मुकादम शेशराव यादव आणि गोकुळ मेश्राम यांनी प्रवीण फुलसिंग इनवाती यांची भेट घेऊन आम्हाला ऊस तोडणीसाठी वर्धा येथे पाठविण्यासाठी मजूर पाहिजेत. महिला आणि पुरुष मजुराला ५०० रुपये मजुरी देऊ तसेच त्यांना एक आठवड्याचे रेशन फुकट देऊ असे आमिष दाखविले.
चर्चा झाल्यानंतर १० महिला आणि ५ पुरुष असे १५ मजूर ऊस तोडणीला जाण्यासाठी तयार झाले. ७ नोव्हेंबर रोजी हे १५ मजूर रेल्वेने अंबाजोगाई येथे आणले. तेथून तुम्हाला ऊस तोडण्याच्या ठिकाणी नेतो असे सांगून मुकादमाने त्यांना एका टेम्पोतून मोहोळ तालुक्यातील ढोकबाभूळगाव येथे आणले.
सर्वजण ऊसतोडीचे काम करत होते, परंतु ठरल्याप्रमाणे त्यांना काही किराणा साहित्य दिले आणि काही दिले नाही. ठेकेदार ट्रॅक्टर मालकास पैशाची आणि सामानाची मागणी केली असता पैसे आणि सामान तर दिलेच नाही. उलट बळजबरीने काम करून घेतले जात होते. काम न केल्यास कारखान्यावर नेऊन कोंडून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत प्रवीण फुलसिंग इनवाती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान,या घटनेची गांभीर्याने दखल घेत बालाघाट प्रशासनाच्या माध्यमातून लेबर निरीक्षक राकेश ठाकूर यांच्यासमवेत एका स्वतंत्र बसची व्यवस्था करून पोलिस पथकासह ही टीम मोहोळला आली.
0 Comments