धुळे : तरुणांना नोकरी न मिळाल्यानंतर येणाऱ्या नैराश्यातून तरुण आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात. याच नैराश्यातून तरुणांना बाहेर काढण्यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी उत्तर प्रदेश येथील तरुणाने पदयात्रेच्या माध्यमातून तरुणांमध्ये प्रबोधन करण्याचा संकल्प केला आहे. आत्तापर्यंत 2100 किलोमीटर अंतर पायी चालत या तरुणाने नैराश्यात असलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी ही पदयात्रा सुरू केली आहे.
पूर्ण भारतभर अशाच पद्धतीने तरुणांमध्ये जनजागृती करण्यासाठी पदयात्रेच्या माध्यमातून हा तरुण पाई फिरत आहे. या तरुणाने ही पदयात्रा मध्यप्रदेश येथून सुरू केली असून सध्या तो धुळ्यामध्ये पोहोचला आहे. तसेच यापुढे देखील तो मुंबईच्या दिशेने निघाला असून संपूर्ण भारतभर हे प्रबोधन करण्यासाठी तो फिरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
स्वतः करत होता भरतीसाठी प्रयत्न
हा तरुण स्वतः पोलीस भरतीत त्याचबरोबर आर्मीत भरती होण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले. परंतु, वयोमर्यादा संपल्यानंतर नैराश्यात न जाता आपल्यासारख्या इतर नैराश्यात असलेल्या तरुणांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी या तरुणाने ही पदयात्रा सुरू केली आहे.
0 Comments