वाढदिवसानिमित्त वापरल्या जाणाऱ्या आकर्षक मेणबत्त्या या कारखान्यामध्ये बनवल्या जात होत्या. या दरम्यान आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागली. या आगीत होरपळून चौघी महिलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मयत मजूर हे जैताने येथील राहणारे असल्याचे समजते. मयतांमध्ये आशाबाई भैया भागवत (वय ३५ वर्ष) आणि राजश्री भैया भागवत (वय १५ वर्ष), नयना संजय माळी, सिंधुबाई धुडकू राजपूत या चौघींचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
चौकशीतच आगीच नेमकं कारण समोर येणार असल्याचं पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून, बाकीच्या जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मला जाणवलं घराला आग लागली आणि...; १३ वर्षाच्या मुलीनं धुमसत्या आगीतून पाच भावंडांचा जीव वाचवला
0 Comments