संत सेना महाराज यांचे जीवन चरित्र -संपादक रमेश मोतिराम ईशी

संत सेना महाराज हे विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे निस्सीम भक्त होते. सेना महाराज विठोबाला समर्पित वारकरी संप्रदायातील एक मोठे हिंदू संत कवी आहेत.

परिचय
सेना महाराज हे एक मराठी संत असून त्यांना नामदेवांच्या काळातील एक महान संत मानले जातात. श्री सेना न्हावी – संत सेना महाराज म्हणून प्रसिद्ध असे व्यवसायाने न्हावी होते. असे म्हणतात की ते भगवान विठ्ठलाच्या पूजेत मग्न होते की एके दिवशी त्यांना स्थानिक राजाचा कोप झाला. राजाला शांत करण्यासाठी आणि श्रीसेना न्हावीला सोडवण्यासाठी भगवान विठ्ठल स्वतः प्रकट झाले असे म्हणतात.
संत सेना महाराज यांचा जन्म
संत सेना महाराज यांचा जन्म १३५७ या दिवशी मध्यप्रदेशमधील बांधवगड मध्ये झाला. बांधवगड हे एक वैभवशाली शहर होते. त्यांच्या वडिलांचे नाव देवीदासपंत तर आईचे नाव प्रेमकुंवरबाई होते.

संत सेना महाराज यांचे जीवन
लोक असे म्हणतात कि सेना महाराजांचा जन्म हा देवाच्या कृपेने झाला होता. सेना महाराजांवर लहानपणापासून देवांची पूजा करणे, भक्तीपाठ करणे असले वातावरण असल्यामुळे बालपणापासुनच त्यांच्यावर चांगले संस्कार झाले होते. आपल्या वडीलांच्या सोबत राहून चांगले संस्कार सेनाजीच्या मनावर होत होते.

संत सेना महाराज यांच्याबाबद्दल आख्यायिका
सेना महाराजांचा मूळ व्यवसाय हा नाभिकाचा होता. त्यांना बादशाहाची हजामत करण्याचे काम असे. सेना न्हावी हा एक धार्मिक न्हावी होता जो दररोज सकाळी विष्णूची पूजा करत असे. मागील जन्मातील पापांमुळे तो निम्न जातीत जन्माला आला. एकदा बांधवगडच्या राजाने सेना महाराज यांना आपल्या सेवेत बोलावले.
न्यायालयाचे अधिकारी सेना महाराज यांच्या घरी निरोप घेऊन आले; तथापि, सेना महाराज त्याच्या दैनंदिन उपासनेत व्यस्त होते आणि त्याने आपल्या पत्नीला आपण घरी नसल्याचे संदेशवाहकांना कळवण्यास सांगितले. हे असे पाच वेळा झाले. एका शेजाऱ्याने राजाला सांगितले की सेना घरी पूजा करत आहे, ज्यामुळे राजा चिडला. शाही आदेश असूनही राजवाड्यात न आल्याने सेना महाराज यांना अटक करून त्याला साखळदंडांनी बांधून नदीत फेकण्याचा आदेश त्याने दिला
सेना महाराज हे एक वारकरी संप्रदायातील संत असून त्यांना ज्ञानदेव-नामदेवांच्या परिवारातील मानले जाते.

संत सेना महाराज
मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले. अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले. तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा.

सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते. एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुद्धा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरून सिद्ध होते. अतिशय उच्च विचारसरणी व पंढरीनाथावर निष्ठा असणारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घङले महाराष्ट्रीय संताच्या सहवासात, अशी त्याची जीवन यात्रा अखेर पर्यंत चालू राहिली. बऱ्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकङे सर्वाचा निरोप घेऊन जायला निघाले.

जिथे जन्मलो त्या मातीची ओढ लागली होती त्याच्या पुनरागमनानतंर बाधंवगङला पुनर्वैभव प्राप्त झाले राजा बिरसिंहांनी त्याचे स्वागत केले. गावी आल्यानंतरही ते फारसे कुणात रमत नसत. दृष्टी सतत शून्यात होती. येताना त्या पंढरीनाथाच रूप ङोळ्यात साठवले होते. एकादशीला दिवसभर घरातच चितंनात मग्न राहिले. दुसरा दिवस उजाडला. कुणाशीही न बोलता धोकटी खुंटीला अङकवून तिथेच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुङीतील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले 'जाता पंढरीसी सूख वाटे जीवा' असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लीन झाला. तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा. या दिवशी सेना महाराज पुण्यतिथी पाळली जाते.
चरित्र, काळ, काव्य
संपादन करा
संत नामदेव, नरहरी सोनार, परिसा भागवत, जनाबाई, चोखामेळा या संतांप्रमाणे संत सेनांचे कोठेही स्वतंत्र, सांगोपांग चरित्र उपलब्ध नाही. समकालीन संतांनी सेना महाराजांचा एक विठ्ठलाचे निःसीम भक्त म्हणून आपल्या अभंगांमधून उल्लेख केला आहे. (संत जनाबाई) शिखांचा धर्मग्रंथ, ‘गुरुग्रंथसाहिब’ या पवित्र ग्रंथात संत सेनांच्या एका पदाचा समावेश केला आहे. त्यांच्या अनेक उत्तरकालीन संतांनी, हिंदी-मराठी संशोधकांनी त्यांच्या काव्याचा अभ्यास मांडलेला आहे.

संत सेना यांच्या जन्मस्थळाबाबत, जन्मकाळाबाबत, अनेक अभ्यासक, संशोधकांमध्ये एकमत नाही. आजही त्याबद्दल अनिश्चितता आहे. शिवाय ते महाराष्ट्रीय की अमहाराष्ट्रीय या बाबतीतही अनेक मतभेद आहेत. पूर्वीपासून वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रीय संतांसमवेत त्यांचे नाव घेतले जाते. त्यांची मराठी धाटणीची, वळणाची, संस्कारांची मराठी कविता (रचना) आज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच उत्तर भारतातील प्रांतात विशेषतः पंजाब, राजस्थान, गुजराथ, उत्तरप्रदेश या प्रदेशातील भाषेत त्यांच्या रचनांचा उल्लेख आहे, परंतु मराठीच्या मानाने त्याचे प्रमाण कमी आहे. शिवाय स्वामी रामानंदांचे शिष्यत्व त्यांना लाभल्याने त्यांच्या जन्मठिकाणाबाबत एकमत व्यक्त करणे अवघड वाटते.

संत सेनामहाराज हे आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात उतर भारतामध्ये गेले होते. स्वामी रामानंदांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांनी पुढे हिंदी रचना केली असावी. संत नामदेवांप्रमाणेच संत सेना यांनी मराठी प्रदेशातून हिंदी प्रांतात जाऊन दोन्ही प्रांतांमधील भाषांमध्ये साहित्य लिहिले आहे.
संत सेना महाराज यांचे जीवन
लोक असे म्हणतात कि सेना महाराजांचा जन्म हा देवाच्या कृपेने झाला होता. सेना महाराजांवर लहानपणापासून देवांची पूजा करणे, भक्तीपाठ करणे असले वातावरण असल्यामुळे बालपणापासुनच त्यांच्यावर चांगले संस्कार झाले होते. आपल्या वडीलांच्या सोबत राहून चांगले संस्कार सेनाजीच्या मनावर होत होते.
न्यायालयाचे अधिकारी सेना महाराज यांच्या घरी निरोप घेऊन आले; तथापि, सेना महाराज त्याच्या दैनंदिन उपासनेत व्यस्त होते आणि त्याने आपल्या पत्नीला आपण घरी नसल्याचे संदेशवाहकांना कळवण्यास सांगितले. हे असे पाच वेळा झाले. एका शेजाऱ्याने राजाला सांगितले की सेना घरी पूजा करत आहे, ज्यामुळे राजा चिडला. शाही आदेश असूनही राजवाड्यात न आल्याने सेना महाराज यांना अटक करून त्याला साखळदंडांनी बांधून नदीत फेकण्याचा आदेश त्याने दिला.
सेना महाराज यांच्या अभंगातील शिकवण
सेना न्हावी यांनी लिहिलेले अनेक अभंग आहेत. ते एका अभंगात म्हणतात की जे दुष्टांचा संग ठेवतात ते नरकात राहतात. दुसर्‍या अभंगात, ते अशा सर्व लोकांना पापी बोलतात जे उत्कटतेने आणि क्रोधाने बोलतात, ज्याने सत्पुरुषांची संगत ठेवली नाही आणि देवाचे ध्यान केले नाही. तो देवाला शरण जातो आणि त्याला आपला तारणारा होण्यासाठी आणि त्याला पापी जीवनातून सोडवण्याची विनंती करतो.
संत सेना महाराज यांचे निधन
आपल्या गावी आल्यानंतर त्याचे मन कशात सुद्धा मन लागत नव्हते. त्यांना दिवस रात्र पांडुरंगाचे नाव आठवत होते. एकादशीला ते दिवसभर आपल्या घरात चिंतन करत बसले होते. दुसऱ्या दिवशी पांडुरंगाचे नामस्मरण करत त्यांनी समाधी घेतली आणि अनंतात विलीन झाले.

तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा होता. या दिवशी सेना महाराज यांची पुण्यतिथी म्हणून पाळली जाते. बांधवगड येथे आजही सेना महाराजांचे स्मृती ठिकाण आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रदक्षिणा मार्गावर महादेव मंदिरासमोर संत सेना न्हावी महाराज यांचे समाधी मंदिर आहे.

निष्कर्ष
महाराष्ट्राच्या महान संतांच्या मालिकेत संत सेना महाराज यांचे सुद्धा मोठ्या आदराने नाव घेतले जाते. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील बांधवगड संस्थानात झाला. ते पांडुरंगाचे एक महान वारकरी संत होते.

संत सेना महाराज यांच्याबाबद्दल आख्यायिका
सेना महाराजांचा मूळ व्यवसाय हा नाभिकाचा होता. त्यांना बादशाहाची हजामत करण्याचे काम असे. सेना न्हावी हा एक धार्मिक न्हावी होता जो दररोज सकाळी विष्णूची पूजा करत असे. मागील जन्मातील पापांमुळे तो निम्न जातीत जन्माला आला. एकदा बांधवगडच्या राजाने सेना महाराज यांना आपल्या सेवेत बोलावले.
हे प्रसिद्ध संत सेना महाराज व्यवसायाने न्हावी होते. त्यांचा प्रसिद्ध अभंग:
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ।।
सेना महाराजांवरील पुस्तके
संपादन करा
भगवद्भक्त सेनाजी महाराज गाथा (ज.तु. शेटे व बाबुराव जाधव)
विवेक आयना (संत सेना महाराजांच्या जीवनावरील कादंबरी, लेखिका - लीला दीक्षित)
संत सेना महाराज (उन्मेष - वैशाली प्रकाशन,पुणे, २०)
श्री सेना महाराज (र.रा. गोसावी व वीणा गोसावी)
संत सेना महाराज (रमेश मुधोळकर)
संत सेना महाराज (लक्ष्मण सूर्यभान)
संत सेना महाराज-काव्यदर्शन-समीक्षा आणि संहिता (राजेंद्र वाटाणे)
श्री संत सेना महाराज चरित्र व काव्य. (मधू जाधव)
संत सेना महाराजांच्या जीवन चरित्रावर कीर्तन व अभंग गाथा. (निंबराज महाराज जाधव)

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e