जिल्ह्यातील स्थिती
राज्यांनी अथवा देशभरात असे झाले असेल तर स्वाभाविक जिल्ह्याजिल्ह्यातून गेलेली आकडेवारी त्यास कारणीभूत ठरते. जळगाव जिल्ह्यातही कोविड पोर्टलवर दररोज अपडेट होणाऱ्या अहवालानुसार मार्च २०२० ते एप्रिल २०२२ या दोन वर्षांत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २५९१ दर्शविला आहे. प्रत्यक्षात हा आकडा जास्त असल्याचा आरोप याआधी झाला आहे
मदतीचे अर्ज आठ हजारांवर
कोविड पोर्टलवरील मृत्युंची नोंद २५९१ असली तरी प्रत्यक्षात त्यापेक्षा तिप्पट, चौपटीने बळी गेल्याचे सांगितले जाते. कोविडने मृत झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजारांची मदत देण्याचे शासन धोरण ठरल्यानंतर त्यासाठी अर्ज मागविण्यात आलेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातून ८ हजार ५०० अर्ज प्राप्त झालेत. त्याची छाननी, पडताळणी होऊन तब्बल ६१०० अर्ज मंजूर झाले असून त्यांना एकतर सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळालीय, अथवा मिळण्याच्या प्रक्रियेत आहे. उर्वरित ११०० अर्ज प्रलंबित असून त्यापैकी काही अर्ज मंजूर होण्याची शक्यता आहे. अन्य १३०० अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
याचाच अर्थ असा की, प्रशासनाने जिल्ह्यात ६१०० कोविड मृत्यू मान्य केले आहेत. त्यामुळे कोविड मृतांचा आकडा खरा आकडा लपविला जात असल्याच्या आरोपाला या आकडेवारीने पुष्टी मिळत असल्याचे मानले जात आहे.
0 Comments