मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना १४ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे दोन्ही गावावर शोककळा पसरली असून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पालम तालुक्यातील बनवस परिसरातील रामापूर तांडा व पिराचा तांडा येथील काही मजूर कुटुंबासह बालाघाट सिद्धी शुगर सहकारी साखर कारखाना येथे गेले होते.
घरातील धुणे धुण्यासाठी मायलेकी व दोन बहिणी या पाझर तलावाकडे गेल्या होत्या. मागील काही दिवसात कॅनालला पाणी आल्याने या पाझर तलावात पाणी पातळी वाढली होती. त्यामुळे रामपूर तांडा येथील राधाबाई धोंडीबा आडे, त्यांच्या मुली दिक्षा आडे, काजल आडे आणि पिराचा तांडा येथील सुषमा संजय राठोड व अरुणा गंगाधर राठोड यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
0 Comments