नाशिक मधील वडनेर भैरवमध्ये राहणाऱ्या अनिल साळुंखे याचे डोंबिवली मधील या २८ वर्षीय तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र, अनिल हा विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती ललिता हिच्या कुटुंबीयांना मिळाल्याने कुटुंबियांनी तिचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरवले आणि काही दिवसांपूर्वी तिचा साखरपुडा देखील झाला. मात्र, आपली प्रेयसी दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करत असल्याचे अनिल याला सहन झाले नाही. याच रागातून २९ मे रोजी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास ललित तिला शेवटचे भेटण्याच्या निमित्ताने तिच्या घरी पोहचला.
त्यानंतर रागाच्या भरात त्याने ललिताचा नायलॉन दोरीने गळा आवळला एवढ्यावरच न थांबता त्याने उशीने नाक तोंड दाबून तिची हत्या केली. यानंतर त्याच नायलॉन दोरीने त्याने स्वता पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, सकाळी ११ वाजता हाका मारूनही बहिण दरवाजा उघडत नसल्याने ललिता हिच्या बहिणेने दरवाजा उघडून पाहिल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.
0 Comments