वसई-विरार महापालिकेतील बडे अधिकारी ठाणे ACB च्या जाळ्यात, लाच घेताना रंगेहाथ पकडले

मुंबई : वसई-विरार महापालिकेतून खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करत ४० हजारांची लाच मागणाऱ्या वसई-विरार महापालिकेतील तीन अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. वसई-विरार पालिकेतील प्रभाग समिती एफ पेल्हार येथील प्रभारी सहाय्यक आयुक्त रुपाली संखे, ठेका अभियंता हितेश जाधव आणि त्यांच्या साथीदार गणेश झणके याला सापळा रचून गुरुवारी एसीबीने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार महापालिकेच्या या तीन अधिकाऱ्यांनी एका बांधकाम विकासकाकडे जून महिन्यात ४० हजाराची लाच मागितली होती. त्यानंतर या प्रकरणाची एसीबीला खबर मिळताच त्यांनी आरोपीं विरोधात सापळ रचला. रुपाली संखे,हितेश जाधव आणि गणेश झणके लाच स्विकारण्यासाठी गेले असता ठाणे एसीबीने सापळा रचून या तिघांना रंगेहाथ पकडले. लाच लुचपत प्रतिबंध विभागाने तिघांना लाच घेतना बिलालपाडा येथे अटक केली आहे.'

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e