संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चाची चौकशी करण्यासाठी ईडी आली होती. आता सरनाईक यांनी अर्पण केलेलं सोनं दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला.
अंबादास दानवे म्हणाले, संजय राऊत यांच्या लग्नामध्ये मेहंदी लावणाऱ्याची चौकशी झाली. फूल सजावट करणाऱ्याची चौकशी झाली. आता अशाप्रकारे संपत्तीचं ओंगळवाणं प्रदर्शन करतात. ईडी या संस्थेला हे दिसत नाही का, असा सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी विचारलाय.
प्रताप सरनाईक हे रिक्षाचालक होते, असं सांगतात. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नानंतर त्यांनी राळ उठवली होती. लग्नातील खर्चावर ईडीची चौकशी झाली पाहिजे. आज सोन्याच्या पादुका आणि हार अर्पण करण्यात आला. इतका पैसा या लोकांकडं कुठून आला, असा सवालही राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारला.
शिंदे गटानं दसरा मेळावा भरविला. तेव्हा एसटी महामंडळाला दहा कोटी रुपये दिले होते. ते पैसे कुणी दिले होते, असाही सवाल ठाकरे गटानं विचारलाय.
0 Comments